Posts

Showing posts from June, 2020

वालचंद डायरीज् – भाग २१

वालचंद डायरीज् – भाग २१ वालचंद सोडताना गेले सलग २० दिवस (मध्ये दोन दिवस सुट्टी सोडून) वालचंद कॉलेज मधले माझे अनुभव लिहितो आहे. लिहिण्यासारखे अजून बरेच आहे. पण मी काही लेखक नव्हे. तेंव्हा वाचकांना कंटाळा येण्यापूर्वी थांबलेलं चांगलं. नाही का ? खरंतर स्वतःसाठी म्हणून लिहायला सुरुवात केली होती.   माझे वालचंदमधले अनुभव मी सगळ्यांसाठी शब्दबद्ध करावेत म्हणून पाठपुरावा करणारी विद्यार्थिनी मैत्रीण वैष्णवी आणि हे लेखन   ब्लॉग रूपात पब्लिश करायचं ठरवल्यावर blog चे होमपेज वगैरे तयार करायला मदत करणारी ऋतुजा आणि   सुरुवातीचे काही भाग बारकाईने वाचून त्यात   सुधारणा सुचवणारा एक विद्यार्थी मित्र आदित्य सर्वांनाच मनापासून धन्यवाद...मी सुचेल तसं लिहित जायचो , त्यामुळे लेखाचा आशय मला किंवा काँलेज संबंधित कुणी वाचला तर समजेल असा असायचा .पण बाहेरच्या कुणी हे लेख वाचले तर संदर्भ लागतील असे नव्हते. शिवाय अनेकदा माझं लेखन complecated व्हायचं. संयुक्त वाक्यं व्हायची.   मग प्रत्येक भाग बारकाईने वाचून त्यात सुटसुटीतपणा , सोपेपणा आणण्याचं आणि वाक्यरचना , शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्...

परिस्थिती

                                                                         परिस्थिती                                                 रस्त्यावरती दिसली मला एक गजरेवाली पोर                                                     शाळा तिची बुडते आहे याचा मनी घोर                                                 म्हणत होती ती," ताई एक गजरा घेना"                             ...

कोरोना

Image
                                                                                                           सई देसाई,इ. ६ वी

वालचंद डायरीज् – भाग २०

वालचंद डायरीज् – भाग २० Baja –पुनःश्च हरी ओम् २०१५ मध्ये efficycle दोन वर्षाच्या खंडानंतर सुरू झालं. Baja मध्ये भाग घेऊन चार वर्षे उलटून गेली होती. Main Baja (MBaja) बरोबरच electric Baja (EBaja) चालू झालेलं होतं. आता नव्याने स्पर्धेत सहभागी होणे अवघड झालं होतं कारण या चार वर्षात स्पर्धा खूप कठीण झालेली होती. आपले विद्यार्थी त्यात सहभागी होत नाहीत याचं वाईट वाटायचं. २०१२ च्या स्पर्धेवेळी अगदी first year ला असणारे विद्यार्थी पण आता बाहेर पडलेले होते. म्हणजे निखारा पूर्णपणे विझला होता. नुसती फुंकर पुरणार नव्हती. कुणीतरी आतून पेटायला होतं. मार्च २०१६ मध्ये third year मधल्या चार मुली भेटायला आल्या. “ सर , आम्हाला Baja करायचंय. ” मला काय बोलावं कळेना, “ करायचं म्हणजे ? ते काय गॅदरींगमध्ये डान्स करण्यासारखं आहे का ?” असे शब्द मी फक्त ओठावर येऊ दिले नाहीत. या चौघी डिप्लोमा करून डिग्रीला आलेल्या होत्या आणि तोपर्यंत वर्गात त्यांची उपस्थिती कधी फारशी जाणवली नव्हती. मी मग जास्त उत्साह न दाखवता “ बघू ” एवढंच उत्तर दिलं. दुसर्‍या दिवशी त्याच वर्गातल्या अजून दोन मुली   आल्या. “Baja करायचंय...

आई

Image
                                                                                               सई देसाई,इ. ६ वी

वालचंद डायरीज् – भाग १९

वालचंद डायरीज् – भाग १९ E fficycle ची नव्याने सुरुवात       विभागामधील बदललेलं वातावरण , अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मुलांनी वेळ वाया घालवू नये अशा मताचे शिक्षक , त्यामुळे मुलांमध्ये पसरलेला निरुत्साह आणि अंतिम वर्षात विद्यार्थ्यांचा प्लेसमेंट आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा यांच्याकडे वाढलेला ओढा   अशा सगळ्या कारणांमुळे Baja आणि efficycle मध्ये सहभागी व्हायची परंपरा २०१४ -१५ या वर्षात खंडीत झाली. पण निखारा पूर्णपणे विझलेला नव्हता. थोडी धुगधुगी शिल्लक होती. सुरुवातीपासूनच आधीच्या टीमने पुढची टीम तयार करायची , त्यासाठी जुनियरना प्रेरित करायचं , त्यांची निवड करायची अशी पद्धत पडलेली होती. टीमने मिळवलेले बक्षीस पुढची टीम तयार होण्यासाठी जास्त उपयोगी पडायचे. मार्च-एप्रिल २०१५ मध्ये कोणीतरी या धुगधुगी शिल्लक असलेल्या निखाऱ्यावर फुंकर घातली , नेमकी कुणी हे   माहिती नाही पण माझेच कोणीतरी सहकारी शिक्षक असावेत. त्यावेळी second year पूर्ण करून third year मध्ये जाणाऱ्या वर्गात मग थोडा उत्साह आला. अंतिम वर्षातले कोणी फारसे उत्सुक नव्हते. त्य...

सावरकर

Image
                                                        सई देसाई,इ. ६ वी

वालचंद डायरीज् – भाग १८

वालचंद डायरीज् – भाग १८ E fficycle ची सुरुवात जानेवारी २०११ मध्ये पहिले Baja झालं. टीमला बक्षीस नाही मिळालं पण कॉलेजमध्ये त्याची पुरेशी हवा झाली. अर्थात या सगळ्या प्रक्रियेतून मिळालेले अनुभव इतके विलक्षण होते की लगेचच पुढची टीम तयार व्हायला लागली. पहिली टीम तयार होताना २५ जण मिळतील का अशी शंका होती तर आता कोण २५   निवडायचे असा प्रश्न पडला. आधीचा अनुभव , तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य अशा काही कसोट्या लावून २५ जणांची टीम तयार झाली. पुढचा वादाचा मुद्दा आला की संघाचा कप्तान कोण ? पहिली टीम तयार होताना असा काही वाद झालाच नव्हता. किंवा झाला असला तरी आमच्या पर्यंत आलेला नव्हता. (नंतरही २०१९ पर्यंत जवळ जवळ वीस टीमबरोबर अशा वेगवेगळ्या स्पर्धांसाठी काम केलं पण कप्तान पदावरून कधीच वाद झाला नाही.) यावेळी कप्तान व्हायला दोघे उत्सुक होते. दोघेही तुल्यबळ होते. जवळजवळ आठ दिवस यावर चर्चा , भांडणं चालू होती. निर्णय घेणं आम्हाला दोघांनाही अवघड वाटत होतं. शेवटी लोकशाही पद्धतीने निर्णय घेतला आणि एकाचं नाव कप्तान म्हणून जाहीर केलं. पण लगेच दुसरा इच्छुक उमेदवार आणि त्याच्या बरोबर आणखीन दोन तीन लोकांनी...