प्रवास जेवणदायी शिक्षणाकडून जीवनदायी शिक्षणाकडे
वा. मिलिंद नाईक प्राचार्य 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज देश सोडून गेले पण इंग्रजांनी घालून दिलेली शिक्षणपद्धती आपण आजही तशीच चालवतो. इंग्रजांनी घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीचे उद्दिष्टच मुळी केवळ त्यांनी चालवलेल्या उद्योगधंद्यांना कर्मचारी मिळवणे होते. त्या काळात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होत होते आणि त्या औद्योगिकरणाच्या झपाट्यात उद्योगांना लागणारे कर्मचारी तयार करणे हेच शिक्षणाचे एकमेव उद्दिष्ट झाले होते. त्या काळात भारतात गरीबीही पुष्कळ होती आणि त्यामुळे भारतातील लोकांनी इंग्रजानी घालून दिलेली जेवणदायी शिक्षणपद्धती स्वीकारणे भाग होते. नोकरी करणे, पैसा मिळवणे, घरदार करणे याच्यापलिकडे जाऊन आयुष्याला काही वेगळे उद्दिष्ट असते याचा त्या काळात संपूर्ण विसर पडला होता. आणि ते स्वाभाविकही होते. पोट भरलेले नसताना अन्य काही उद्दिष्ट ठेवणे हे शक्यही नव्हते. परंतु आता भारतातील परिस्थिती वेगळी आहे. मोठ्या प्रमाणावरती सुधारणा झाल्या आहेत. लोकसंख्येचा एक मोठा भाग आता केवळ पोटासाठी शिक्षण घेत नाही. आणि म्हणून आता जीवनदायी शिक्षणाचा विचार केला पाहिजे. माणसाला त्याच्या अन्न, व...