वालचंद डायरीज् – भाग १७
वालचंद डायरीज् – भाग १७ E fficycle ची सुरुवात जानेवारी २०११ मध्ये पहिले Baja झालं. टीमला बक्षीस नाही मिळालं पण कॉलेजमध्ये त्याची पुरेशी हवा झाली. अर्थात या सगळ्या प्रक्रियेतून मिळालेले अनुभव इतके विलक्षण होते की लगेचच पुढची टीम तयार व्हायला लागली. पहिली टीम तयार होताना २५ जण मिळतील का अशी शंका होती तर आता कोण २५ निवडायचे असा प्रश्न पडला. आधीचा अनुभव , तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य अशा काही कसोट्या लावून २५ जणांची टीम तयार झाली. पुढचा वादाचा मुद्दा आला की संघाचा कप्तान कोण ? पहिली टीम तयार होताना असा काही वाद झालाच नव्हता. किंवा झाला असला तरी आमच्या पर्यंत आलेला नव्हता. (नंतरही २०१९ पर्यंत जवळ जवळ वीस टीमबरोबर अशा वेगवेगळ्या स्पर्धांसाठी काम केलं पण कप्तान पदावरून कधीच वाद झाला नाही.) यावेळी कप्तान व्हायला दोघे उत्सुक होते. दोघेही तुल्यबळ होते. जवळजवळ आठ दिवस यावर चर्चा , भांडणं चालू होती. निर्णय घेणं आम्हाला दोघांनाही अवघड वाटत होतं. शेवटी लोकशाही पद्धतीने निर्णय घेतला आणि एकाचं नाव कप्तान म्हणून जाहीर केलं. पण लगेच दुसरा इच्छुक उमेदवार आणि त्याच्या बरोबर आणखीन दोन तीन लोकांनी...